गालिब कडे पद नव्ह्ते. पैसा नव्हता. छान_छोकीचे कपडे घालुन, इकडे_तिकडे कुठे स्वतःची बढाई मारायला मिळ्ते का म्हणुन त्याला कधी माईक किंवा कैमर्याचा शोधही नसायचा.
गालिब आय_स्पेशलिस्ट नव्ह्ता. बैठका/सभा/संम्मेलनं गाजवणारा नव्हता.
किरमिजा पोशाख घालुन, हवेत अगम्य असे हातवारे करत, स्वतःची दाढी कुरवाळत आणि केसांचे झुबके मिरवत, पोकळ हवेतुन थेट जेष्ठ_श्रेष्ठ गालिबला कधी होताच आलं नाही.
मिर्झा कडे फक्त प्रतिभा होती. जीवनादर्श होता. दृष्टी होती. प्रज्ञा होती. यातुन पैसे मात्र मिळत नसत.
कित्येक वेळा तर पार नाईलाज म्हणुन गालिब वर उसनवार घेवुन दारु पिण्याची वेळ येत असे. कवि, लेखक यांना ड्रम भर चहा आणि दारु कमी पडते म्हणुन आपण नसत्या चौकशा न करणेच योग्य ठरावे!!
त्याच्या जीवनकाळात मिळाला नाही इतका गौरव मात्र गालिबला देह ठेवल्यावर मिळाला! जगाच्या विद्यापिठांनी त्याच्या कवितांचे अभ्यासक्रम चालवावेत इतकं ते सगळं भव्य_दिव्य ठरलं.
चार ओळी किंवा चारोळी ही लिहु न शकणार्या महनीय व्यक्तिंचा आजचा काळ.
किंबहुना काहीही न लिहता खुप काही लिहले असा भास निर्माण करता यावा यातच सगळं आलं! कारण आपण भासमान जगात राहत आहोत.
वर्चुअल! मग गालिब काय आणि तुकाराम काय! सगळंच वर्चुअल. हेच आजचं वास्तव असावं. __
>>> कधी काळी लिहलेल्या रणजित खोमणे यांच्या लेखातुन...
No comments:
Post a Comment